मुख्य सामग्रीवर वगळा
नाकातून रक्त येणे  Epistaxis .



उन्हाळा या ऋतूमध्ये सामान्यता दिसून येणारी समस्या म्हणजे नाकातून रक्त येणे .
उन्हाळ्यामध्ये वातावरणामध्ये असणारी उष्णता आणि कोरडेपणा यामुळे शरीर आणि नाकपुड्या यामध्ये कोरडेपणा निर्माण होतो . नाकपुड्या मध्ये असणारा ओलावा कमी होवून तिथे जास्त प्रमाणात कोरडेपणा निर्माण होतो . नाकपुड्या मध्ये असणाऱ्या रक्तवाहिन्या अतिशय लहान व त्वचेला लागून असतात त्यामुळे त्यांचे कार्य व्यवस्थित होण्यासाठी तिथे ओलावा आणे आवश्यक असते . यामध्ये उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे गरजेचे असते .

नाकातून रक्त येण्याची कारणे ?
नाकाला जखम होणे
कष्टाचं काम
उच्च रक्तदाब
उंचीवरच्या प्रदेशात जाणे
नाक फार जोरानं शिंकरणे
उन्हामध्ये काम केल्यानंतर / उन्हामध्ये फिरल्याने

नाकातून रक्त आल्यास करायचे उपाय
खाली बसावे
थोडेसे पुढे झुकावे म्हणजे रक्त हे आपल्या घशात जाणार नाही
थंड, ओला कपडा आपल्या नाकाखाली धरावा म्हणजे आपल्या नाकातील रक्तवाहीन्या आकुंचित होऊन रक्तस्त्राव थांबेल.
रक्त हे एकाच नाकपुडीतून येत असेल तर, त्या नाकपुडीच्या वरच्या भागात घट्ट दाबून धरावे.
दोन्ही नाकपुड्यांतून रक्त येत असेल तर, आपल्या नाकपुड्या किमान दहा मिनिटे दाबून धराव्यात.
तरीही रक्तस्त्राव चालूच राहिल्यास, आणखी दहा मिनिटे दाब द्यावा.
रक्तस्त्राव हा नाकाला थेट झालेल्या जखमेमुळं झाला असेल तर, केवळ हलकाच दाब द्यावा.
जोरदार रक्तस्त्राव चालूच राहिल्यास किंवा नाकातून वारंवार चालू राहिल्यास, एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

नाकातून रक्त येऊ नये म्हणून
कोरडेपणा निर्माण होत असल्यास गाईच्या तुपाचे २ -२ थेंब दोन्ही नाकपुडी मध्ये सोडावे .
नारिकेल तेलाचे २-२ थेंब दोन्ही नाकपुडी मध्ये सोडावे .
बाहेर उन्हामध्ये जाताना तेल / तुपाचे थेंब नाकपुडीत सोडून बाहेर पडावे .
उष्ण हवेच्या झळा पासून वाचण्यासाठी नाकाला रुमाल बांधावा .

आरोग्यावेल आयुर्वेद, रहिमतपूर, सातारा .
वैद्य श्रीधर राजेंद्र पवार
९४०४४०५७०६ , ९५९५५९९८७८

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शीतपित्त: आयुर्वेदातील दृष्टिकोन

 शीतपित्त हा एक सामान्य त्वचारोग आहे ज्यामध्ये त्वचेवर खाज येणारे चट्टे किंवा फोड तयार होतात. याला आधुनिक वैद्यकात "अर्तिकेरिया" (हायव्ह्ज) असे म्हटले जाते. आयुर्वेदात शीतपित्त हा दोषांमध्ये झालेल्या असंतुलनामुळे होतो, विशेषतः वात आणि कफ यांचे असमतोल आणि रकत (रक्त) धातूतील असंतुलन या विकारास कारणीभूत ठरतात. आयुर्वेद शीतपित्तावर शारीरिक तसेच मानसिक उपचार पद्धतींचा वापर करतो, ज्यामुळे शरीराच्या मूळ दोषांचे संतुलन पुन्हा मिळवता येते. शीतपित्ताचे कारणे  आयुर्वेदानुसार, शीतपित्ताचे मुख्य कारण वात आणि कफ दोषांचे विकार आहेत. यामध्ये खालील कारणे समाविष्ट होतात: - अयोग्य आहार आणि जीवनशैली: अतिशीत किंवा अतिगरम पदार्थांचे सेवन, असमय आहार किंवा अधिक प्रमाणात फास्ट फूड खाणे. - धूलकण, फुलांचा पराग, विशिष्ट खाद्यपदार्थ, औषधे इत्यादींमुळे होणारी अ‍ॅलर्जी. - मानसिक ताणतणाव: दीर्घकालीन मानसिक तणाव आणि चिंता यामुळे शरीरातील दोष बिघडतात. - ऋतु अनुकूलता: अत्यधिक उष्णता, थंडी, किंवा हवामानातील बदलामुळे दोष असंतुलित होतात. शीतपित्ताची लक्षणे शीतपित्तात शरीराच्या विविध भागांवर लालसर, फुगलेले आणि खाज...

हिवाळ्यात आरोग्य कसं जपावं? आयुर्वेदिक सल्ला...

हिवाळ्यात आरोग्य कसं जपावं? आयुर्वेदिक सल्ला... हिवाळा हा थंडगार आणि आल्हाददायक असं वातावरण घेऊन येतो. पण, थंडीच्या दिवसांत आपलं शरीर आणि मन संतुलित ठेवण्यासाठी अधिक काळजी घ्यावी लागते. आयुर्वेदानुसार, हिवाळ्यात शरीराची देखभाल करून आपण ऊर्जावान आणि निरोगी राहू शकतो. चला तर मग, हिवाळ्यात आयुर्वेदिक पद्धतींनी आरोग्य कसं जपावं हे जाणून घेऊया. हिवाळा आणि दोषांची समज आयुर्वेदानुसार, हिवाळा मुख्यतः वात आणि कफ दोषांशी संबंधित आहे. वात दोष हा थंड, रुक्ष, हलका आणि गतिशील असतो, तर कफ दोष स्थिर आणि ओलसर असतो. हिवाळ्यात शरीरात थंडी आणि रुक्षता वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीराला गरम, स्थिर आणि स्निग्ध ठेवणं गरजेचं असतं. १. उष्ण आणि पौष्टिक आहाराचा अवलंब करा हिवाळ्यात आपलं पचनशक्ती अधिक मजबूत असते. यामुळे शरीर गरम आणि पौष्टिक पदार्थांना अधिक चांगल्या प्रकारे पचवू शकतं. गरम पदार्थ खा : सुप, पेज, खिचडी अशा गरम पदार्थांचा आहारात समावेश करा. या पदार्थांमध्ये रूट व्हेजिटेबल्स, डाळी आणि तृणधान्यांचा समावेश करा. तुप आणि तेलाचा वापर करा : गायीचं तूप, खोबरेल तेल, तिळाचे तेल हिवाळ्यात विशेषतः उपयुक्त असत...

हिवाळ्यात हातापायांना भेगा का पडतात? - आयुर्वेदीक कारणे व उपाय

  हिवाळ्यात हातापायांना भेगा का पडतात? - आयुर्वेदीक कारणे व उपाय हिवाळ्याच्या थंडीमध्ये त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात, आणि त्यामध्ये हातापायांना पडणाऱ्या भेगा ही एक सामान्य पण त्रासदायक समस्या आहे. आयुर्वेदानुसार, हिवाळ्याच्या ऋतूत "वात दोष" वाढतो, जो थंड, कोरडा, आणि कठोर गुणधर्मांनी युक्त असतो. हिवाळ्यातील थंड व कोरडे वातावरण त्वचेला हानी पोहोचवते आणि यामुळे त्वचा कोरडी होऊन भेगा पडतात. चला जाणून घेऊया, हिवाळ्यात हातापायांना भेगा का पडतात आणि त्यावर आयुर्वेदिक उपाय कोणते आहेत. हातापायांना भेगा का पडतात? आयुर्वेदिक कारणे वात दोषाचा प्रभाव आयुर्वेदानुसार, हिवाळ्यात वात दोष तीव्र होतो, ज्यामुळे त्वचेत कोरडेपणा येतो. वात दोषामुळे त्वचेचा ताण वाढतो आणि त्वचेमधील लवचिकता कमी होते, ज्यामुळे भेगा पडतात. त्वचेतील आर्द्रतेची कमतरता हिवाळ्यात त्वचेमधील नैसर्गिक ओलावा हरवतो, ज्यामुळे त्वचा कठोर व कोरडी होते. वात दोष वाढल्यामुळे त्वचेची आर्द्रता कमी होते, आणि त्वचेवर ताण निर्माण होतो, ज्यामुळे हातापायांवर भेगा पडू शकतात. अयोग्य आहार आणि जीवनशैली वातवर्धक पदार्थांचा (जसे की थंड, को...