मुख्य सामग्रीवर वगळा
२५ मे जागतिक थायराइड दिवस
आज समाजामध्ये थायराइड ग्रंथीशी निगडीत आजारांची संख्या बर्याच प्रमाणात वाढलेली दिसून येते . पूर्वीच्या काळी महिलांच्यामध्ये क्वचित दिसणारे आजार आज महिला , पुरुष , लहान मुले , मुले यामध्ये देखील पाहायला मिळत आहेत . भारतातील थायराइड ग्रंथीशी निगडीत आजारांचे प्रमाण हे लोकसंखेच्या ११ % एवढे २०१८ च्या रिपोर्ट नुसार दिसून आलेले आहे . या वर्षभरात या मध्ये वाढ झाली असणार हे नक्कीच .
       यामध्ये हायपो थायरोइड , हायपर थायराइड , थायराइड कॅन्सर , गलगंड हे महत्वाचे आजार दिसून येतात. आयुर्वेदानुसार सर्व आजारांचे महत्वाचे कारण आहाराचे पचन व्यवस्थित न होणे हे असते . थायराइडचे आजारामध्ये सुद्धा आहार पचन न होणे हे महत्वाचे कारण दिसते. आयोडीन ची कमतरता ,
हायपर थायराइड या आजारामध्ये दिसणारी लक्षणे या बाबत
अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे .
भूक वाढणे
सारखा थकवा जाणवणे.
उष्णता सहन न होणे .
वारंवार जुलाब होणे , उलटी होणे
हृदयाची धडधड वाढणे , काम केल्यावर श्वास वाढणे
सर्व शरीरावर घाम येणे.
केस गळणे.


हायपो थायराइड या आजारामध्ये दिसणारी लक्षणे या बाबत
वजन वाढणे.
थंडी सहन न होणे .
थकवा येणे .
पोट साफ न होणे , संडासला खडा होणे .
त्वचा कोरडी पडणे ,
केस कोरडे होणे .
डिप्रेशन मध्ये जाने
केस गळणे

उपचार / थायराइड चे आजार होऊच नयेत म्हणून -
यामध्ये लाइफस्टाइल मनेजमेंट हे सर्वात महत्वाचे आहे .
वेळेवर आहार सेवन करावा .
नियमित व्यायाम करावा .
औषधोपचार वेळेवर घ्यावा .
औषधोपचार मध्ये आयुर्वेदामधील कांचनार या वनस्पतीचा विशेष फायदा होत असलेला दिसून येतो . त्यासोबतच पचन चागले होण्यासाठी इतर आयुर्वेदातील औषधे वापरता येतात .

वैद्य श्रीधर राजेंद्र पवार
आरोग्यावेल आयुर्वेद , रहिमतपूर , सातारा
मोबा :- ९४०४४०५७०६ , ९५९५५९९८७८


 .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शीतपित्त: आयुर्वेदातील दृष्टिकोन

 शीतपित्त हा एक सामान्य त्वचारोग आहे ज्यामध्ये त्वचेवर खाज येणारे चट्टे किंवा फोड तयार होतात. याला आधुनिक वैद्यकात "अर्तिकेरिया" (हायव्ह्ज) असे म्हटले जाते. आयुर्वेदात शीतपित्त हा दोषांमध्ये झालेल्या असंतुलनामुळे होतो, विशेषतः वात आणि कफ यांचे असमतोल आणि रकत (रक्त) धातूतील असंतुलन या विकारास कारणीभूत ठरतात. आयुर्वेद शीतपित्तावर शारीरिक तसेच मानसिक उपचार पद्धतींचा वापर करतो, ज्यामुळे शरीराच्या मूळ दोषांचे संतुलन पुन्हा मिळवता येते. शीतपित्ताचे कारणे  आयुर्वेदानुसार, शीतपित्ताचे मुख्य कारण वात आणि कफ दोषांचे विकार आहेत. यामध्ये खालील कारणे समाविष्ट होतात: - अयोग्य आहार आणि जीवनशैली: अतिशीत किंवा अतिगरम पदार्थांचे सेवन, असमय आहार किंवा अधिक प्रमाणात फास्ट फूड खाणे. - धूलकण, फुलांचा पराग, विशिष्ट खाद्यपदार्थ, औषधे इत्यादींमुळे होणारी अ‍ॅलर्जी. - मानसिक ताणतणाव: दीर्घकालीन मानसिक तणाव आणि चिंता यामुळे शरीरातील दोष बिघडतात. - ऋतु अनुकूलता: अत्यधिक उष्णता, थंडी, किंवा हवामानातील बदलामुळे दोष असंतुलित होतात. शीतपित्ताची लक्षणे शीतपित्तात शरीराच्या विविध भागांवर लालसर, फुगलेले आणि खाज...

हिवाळ्यात आरोग्य कसं जपावं? आयुर्वेदिक सल्ला...

हिवाळ्यात आरोग्य कसं जपावं? आयुर्वेदिक सल्ला... हिवाळा हा थंडगार आणि आल्हाददायक असं वातावरण घेऊन येतो. पण, थंडीच्या दिवसांत आपलं शरीर आणि मन संतुलित ठेवण्यासाठी अधिक काळजी घ्यावी लागते. आयुर्वेदानुसार, हिवाळ्यात शरीराची देखभाल करून आपण ऊर्जावान आणि निरोगी राहू शकतो. चला तर मग, हिवाळ्यात आयुर्वेदिक पद्धतींनी आरोग्य कसं जपावं हे जाणून घेऊया. हिवाळा आणि दोषांची समज आयुर्वेदानुसार, हिवाळा मुख्यतः वात आणि कफ दोषांशी संबंधित आहे. वात दोष हा थंड, रुक्ष, हलका आणि गतिशील असतो, तर कफ दोष स्थिर आणि ओलसर असतो. हिवाळ्यात शरीरात थंडी आणि रुक्षता वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीराला गरम, स्थिर आणि स्निग्ध ठेवणं गरजेचं असतं. १. उष्ण आणि पौष्टिक आहाराचा अवलंब करा हिवाळ्यात आपलं पचनशक्ती अधिक मजबूत असते. यामुळे शरीर गरम आणि पौष्टिक पदार्थांना अधिक चांगल्या प्रकारे पचवू शकतं. गरम पदार्थ खा : सुप, पेज, खिचडी अशा गरम पदार्थांचा आहारात समावेश करा. या पदार्थांमध्ये रूट व्हेजिटेबल्स, डाळी आणि तृणधान्यांचा समावेश करा. तुप आणि तेलाचा वापर करा : गायीचं तूप, खोबरेल तेल, तिळाचे तेल हिवाळ्यात विशेषतः उपयुक्त असत...

हिवाळ्यात हातापायांना भेगा का पडतात? - आयुर्वेदीक कारणे व उपाय

  हिवाळ्यात हातापायांना भेगा का पडतात? - आयुर्वेदीक कारणे व उपाय हिवाळ्याच्या थंडीमध्ये त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात, आणि त्यामध्ये हातापायांना पडणाऱ्या भेगा ही एक सामान्य पण त्रासदायक समस्या आहे. आयुर्वेदानुसार, हिवाळ्याच्या ऋतूत "वात दोष" वाढतो, जो थंड, कोरडा, आणि कठोर गुणधर्मांनी युक्त असतो. हिवाळ्यातील थंड व कोरडे वातावरण त्वचेला हानी पोहोचवते आणि यामुळे त्वचा कोरडी होऊन भेगा पडतात. चला जाणून घेऊया, हिवाळ्यात हातापायांना भेगा का पडतात आणि त्यावर आयुर्वेदिक उपाय कोणते आहेत. हातापायांना भेगा का पडतात? आयुर्वेदिक कारणे वात दोषाचा प्रभाव आयुर्वेदानुसार, हिवाळ्यात वात दोष तीव्र होतो, ज्यामुळे त्वचेत कोरडेपणा येतो. वात दोषामुळे त्वचेचा ताण वाढतो आणि त्वचेमधील लवचिकता कमी होते, ज्यामुळे भेगा पडतात. त्वचेतील आर्द्रतेची कमतरता हिवाळ्यात त्वचेमधील नैसर्गिक ओलावा हरवतो, ज्यामुळे त्वचा कठोर व कोरडी होते. वात दोष वाढल्यामुळे त्वचेची आर्द्रता कमी होते, आणि त्वचेवर ताण निर्माण होतो, ज्यामुळे हातापायांवर भेगा पडू शकतात. अयोग्य आहार आणि जीवनशैली वातवर्धक पदार्थांचा (जसे की थंड, को...