मुख्य सामग्रीवर वगळा
नाकातून रक्त येणे  Epistaxis .



उन्हाळा या ऋतूमध्ये सामान्यता दिसून येणारी समस्या म्हणजे नाकातून रक्त येणे .
उन्हाळ्यामध्ये वातावरणामध्ये असणारी उष्णता आणि कोरडेपणा यामुळे शरीर आणि नाकपुड्या यामध्ये कोरडेपणा निर्माण होतो . नाकपुड्या मध्ये असणारा ओलावा कमी होवून तिथे जास्त प्रमाणात कोरडेपणा निर्माण होतो . नाकपुड्या मध्ये असणाऱ्या रक्तवाहिन्या अतिशय लहान व त्वचेला लागून असतात त्यामुळे त्यांचे कार्य व्यवस्थित होण्यासाठी तिथे ओलावा आणे आवश्यक असते . यामध्ये उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे गरजेचे असते .

नाकातून रक्त येण्याची कारणे ?
नाकाला जखम होणे
कष्टाचं काम
उच्च रक्तदाब
उंचीवरच्या प्रदेशात जाणे
नाक फार जोरानं शिंकरणे
उन्हामध्ये काम केल्यानंतर / उन्हामध्ये फिरल्याने

नाकातून रक्त आल्यास करायचे उपाय
खाली बसावे
थोडेसे पुढे झुकावे म्हणजे रक्त हे आपल्या घशात जाणार नाही
थंड, ओला कपडा आपल्या नाकाखाली धरावा म्हणजे आपल्या नाकातील रक्तवाहीन्या आकुंचित होऊन रक्तस्त्राव थांबेल.
रक्त हे एकाच नाकपुडीतून येत असेल तर, त्या नाकपुडीच्या वरच्या भागात घट्ट दाबून धरावे.
दोन्ही नाकपुड्यांतून रक्त येत असेल तर, आपल्या नाकपुड्या किमान दहा मिनिटे दाबून धराव्यात.
तरीही रक्तस्त्राव चालूच राहिल्यास, आणखी दहा मिनिटे दाब द्यावा.
रक्तस्त्राव हा नाकाला थेट झालेल्या जखमेमुळं झाला असेल तर, केवळ हलकाच दाब द्यावा.
जोरदार रक्तस्त्राव चालूच राहिल्यास किंवा नाकातून वारंवार चालू राहिल्यास, एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

नाकातून रक्त येऊ नये म्हणून
कोरडेपणा निर्माण होत असल्यास गाईच्या तुपाचे २ -२ थेंब दोन्ही नाकपुडी मध्ये सोडावे .
नारिकेल तेलाचे २-२ थेंब दोन्ही नाकपुडी मध्ये सोडावे .
बाहेर उन्हामध्ये जाताना तेल / तुपाचे थेंब नाकपुडीत सोडून बाहेर पडावे .
उष्ण हवेच्या झळा पासून वाचण्यासाठी नाकाला रुमाल बांधावा .

आरोग्यावेल आयुर्वेद, रहिमतपूर, सातारा .
वैद्य श्रीधर राजेंद्र पवार
९४०४४०५७०६ , ९५९५५९९८७८

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंचकर्माचे फायदे: आयुर्वेदिक डिटॉक्स आणि आरोग्याची गुरुकिल्ली 🌿

  पंचकर्माचे फायदे: आयुर्वेदिक डिटॉक्स आणि आरोग्याची गुरुकिल्ली 🌿   पंचकर्म ही आयुर्वेदामधील एक अत्यंत प्रभावी आणि पूर्णपणे शरीर, मन आणि आत्म्याची शुद्धी करणारी चिकित्सा पद्धत आहे. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ (आमा) बाहेर फेकले जातात आणि शरीराचे संतुलन पुनर्संचयित होते. यामुळे आरोग्यात सुधारणा होऊन समग्र कल्याण प्राप्त होते.   पंचकर्माचे फायदे:  1. शरीराची सखोल शुद्धी 🧘‍♀️      पंचकर्माद्वारे शरीरात जमलेले विषारी पदार्थ (आम) बाहेर फेकले जातात. यामुळे शरीराच्या सर्व स्तरांवर शुद्धी होऊन आरोग्यात सुधारणा होते.   2. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे 💪      पंचकर्मामुळे शरीरातील त्रिदोष (वात, पित्त, कफ) संतुलित होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.   3. पाचनशक्ती आणि चयापचय सुधारणे 🍃      पंचकर्मातील विरेचन आणि बस्ती या चिकित्सांमुळे पाचनशक्ती सुधारते आणि चयापचय प्रक्रिया संतुलित होते.   4. ताण-तणाव कमी करणे आणि मानसिक शांती मिळवणे 🧠       शिरोधारा (कपाळावर...

रक्तमोक्षण पंचकर्म: आयुर्वेदातील रक्तशुद्धीकरणाची प्रभावी पद्धत

आयुर्वेदात पंचकर्म चिकित्सा शरीरातील दोष आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी प्रभावी आहे. पंचकर्मातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे रक्तमोक्षण . हे एक असे उपचार आहे ज्यामुळे रक्तशुद्धीकरण करून शरीरातील विकार दूर केले जातात. रक्तमोक्षणामुळे त्वचाविकार, संधिवात, आणि पित्ताशी संबंधित विकारांवर प्रभावी उपचार केला जातो. चला तर मग जाणून घेऊया रक्तमोक्षण पंचकर्माचे महत्त्व, फायदे आणि प्रक्रिया. रक्तमोक्षण म्हणजे काय? रक्तमोक्षण हा पंचकर्मातील एक महत्त्वाचा भाग आहे. या प्रक्रियेत शरीरातील दूषित रक्त बाहेर काढले जाते, ज्यामुळे शरीरातील दोषांचे (विशेषतः पित्त आणि रक्तज विकार) शुद्धीकरण होते. रक्तमोक्षणासाठी विविध पद्धती वापरल्या जातात, जसे की शृंग - कपिंग थेरपी ( सिंंगाचा वापर), जलौका (जळू), किंवा सुईद्वारे रक्त काढणे. या पद्धतीने शरीरातील दूषित रक्त बाहेर काढून नवीन रक्ताची निर्मिती होते आणि विविध विकारांवर उपचार केला जातो. रक्तमोक्षण पंचकर्माचे फायदे रक्तशुद्धीकरण : रक्तमोक्षणामुळे दूषित रक्त बाहेर काढले जाते आणि शरीरात शुद्ध रक्ताचा प्रवाह सुरू होतो. यामुळे त्वचेवरील विकार, पित्ती, आणि अन्य रक्तवि...

शीतपित्त: आयुर्वेदातील दृष्टिकोन

 शीतपित्त हा एक सामान्य त्वचारोग आहे ज्यामध्ये त्वचेवर खाज येणारे चट्टे किंवा फोड तयार होतात. याला आधुनिक वैद्यकात "अर्तिकेरिया" (हायव्ह्ज) असे म्हटले जाते. आयुर्वेदात शीतपित्त हा दोषांमध्ये झालेल्या असंतुलनामुळे होतो, विशेषतः वात आणि कफ यांचे असमतोल आणि रकत (रक्त) धातूतील असंतुलन या विकारास कारणीभूत ठरतात. आयुर्वेद शीतपित्तावर शारीरिक तसेच मानसिक उपचार पद्धतींचा वापर करतो, ज्यामुळे शरीराच्या मूळ दोषांचे संतुलन पुन्हा मिळवता येते. शीतपित्ताचे कारणे  आयुर्वेदानुसार, शीतपित्ताचे मुख्य कारण वात आणि कफ दोषांचे विकार आहेत. यामध्ये खालील कारणे समाविष्ट होतात: - अयोग्य आहार आणि जीवनशैली: अतिशीत किंवा अतिगरम पदार्थांचे सेवन, असमय आहार किंवा अधिक प्रमाणात फास्ट फूड खाणे. - धूलकण, फुलांचा पराग, विशिष्ट खाद्यपदार्थ, औषधे इत्यादींमुळे होणारी अ‍ॅलर्जी. - मानसिक ताणतणाव: दीर्घकालीन मानसिक तणाव आणि चिंता यामुळे शरीरातील दोष बिघडतात. - ऋतु अनुकूलता: अत्यधिक उष्णता, थंडी, किंवा हवामानातील बदलामुळे दोष असंतुलित होतात. शीतपित्ताची लक्षणे शीतपित्तात शरीराच्या विविध भागांवर लालसर, फुगलेले आणि खाज...