मुख्य सामग्रीवर वगळा

पावसाळा आणि आयुर्वेद 1   
Rainy season and Ayurveda 




     वर्षा ऋतु म्हणजे पावसाळा. धरतीला नवसंजीवन देणारा ऋतु. सर्वत्र हिरवेगार गवत उगवलेले असते. नविन फुले फुललेली असतात. वातावरण मात्र ढगाळ असते. रिपरिप पाऊस पडत असतो. नद्यांना पूर आलेले असतात. सर्वत्र चिखल झालेला असतो. अशा वेळी वातावरण निरुत्साही असते. कोणतेच काम करावेसे वाटत नाही.

असे ढगाळ वातावरण, सारखा पाऊस पडणे, दमट, कोंदट, रोगट हवा, विजा चमकणे अशा दिवसाला ’दुर्दिन’ असे म्हटले आहे. दुर्दिन असताना नविन कोणतेही काम करु नये, अभ्यास करु नये, वेदपठण करु नये, असे आयुर्वेदात म्हटले आहे. याचे मूळ कारण म्हणजे सर्व वातावरणच ढगाळ, निरुत्साही कोंदट असते. ग्रंथात असे वर्णन असले तरी ते लाक्षणिक अर्थानेच घ्यावे.

आयुर्वेदानुसार पावसाळा हा वातप्रकोपाचा काळ सांगितलेला आहे. उन्हाळ्यात वाताचा संचय होत असतो. पावसाळ्यात त्याचा प्रकोप होतो. त्यामुळे वातदोषामुळे होणारे विविध विकार पावसाळ्यात होतात. वातप्रकोपावर ’बस्ती’ हा पंचकर्मांपैकी एक महत्वाचा उपक्रम आयुर्वेदात सांगितलेला आहे. विविध औषधांनी युक्त काढ्यांचा किंवा तेलाचा एनिमा विधिपूर्वक घेणे असे सोप्या भाषेत सांगता येईल. या बस्तीने अनेक संभाव्य रोगांचा प्रतिबंध होतो. तसेच वाताचे विकारही बरे होतात.

पावसाळ्यात भूक कमीच लागते. म्हणून भोजनासाठी अगदी हलका आहार घ्यावा. नविन धान्य वापरु नये. एक वर्ष जुने झालेले धान्य वापरावे. नविन धान्य वापरायचेच असेल तर ते भाजून घेऊन नंतर वापरात आणावे. आहारसुद्धा अगदी मोजकाच घ्यावा. जेवणही ठरलेल्या वेळीच घ्यावे. गोड पदार्थ, विविध पक्वान्ने, उडीदासारखे जड पदार्थ, तळलेले, आंबवलेले पदार्थ खाऊ नयेत. कांदा खाऊ नये. सुंठ, हिंग, जिरे, मिरे, आले, लसूण, पुदिना, लिंबू ह्यांचा आहारात भरपूर वापर करावा. त्यामुळे भूक चांगली लागून अन्नपचनही चांगले होते. लसूण हा पावसाळ्यात उत्तम औषधी आहे. तो वातनाशक, भूक वाढविणारा आहे. म्हणून कच्चा लसूण, लसणाची चटणी, फोडणी अशा विविध प्रकारे लसूण वापरावा.

या ऋतूत पालेभाज्या जास्त वापरू नयेत. पालेभाज्या सारक असतात. तसेच त्या नीट धुतल्या गेल्या नाहीत तर पानांना माती, घाण तशीच रहाते व ती जेवणावाटे पोटात जाते. म्हणून पालेभाज्यांचा वापर शक्यतो कमीच करावा. गायीचे तूप भरपूर घ्यावे. गायीचे तूप स्निग्ध, भूक वाढविणारे, शक्तिवर्धक असते. म्हणून ते जेवणात नियमित घ्यावे. इडली, वडा, उत्तप्पा, डोसा, शेव, भजी, कचोरी, भेळ, पाणीपुरी, पाव, ब्रेड, दही, आंबट, तिखट, तळलेले पदार्थ, ह्यांचा अजिबात वापर करु नये. तसेच उघड्यावरचे, हातगाडीवरचे पदार्थ खाऊ नयेत. या पदार्थांनी रोगराई पसरण्याची शक्यता असते. तोंडाला चव यावी म्हणून कैरी, लिंबू, आले यापासून केलेल्या लोणच्यांचा अगदी थोडा वापर करावा. ह्या ऋतूत मांसाहार करू नये. मांसाहाराचे पदार्थ पचायला जड, तेल, तिखट भरपूर असलेले असतात .

खरे तर ह्या ऋतूत भूक कमी लागते, अग्नी मंद असतो म्हणून भारतीय संस्कृतीत ह्या ऋतूत उपवास जास्त सांगितलेले आहेत. पण आपले उपवासाचे पदार्थ भगर, साबुदाणा, शेंगदाणे, रताळी, शिंगाडे हे पदार्थ इतके जड असतात की असे उपवास करावेत की नाहीत यावर चिंतन करण्याची आवश्यकता आहे. आपल्या परंपरेमध्ये सांगितलेला उपवासामागील मूळ हेतूच नष्ट झालेला आहे. असो.

ह्या ऋतूत पाणी अतिशय गढूळ असते. पाण्यामुळे विविध रोग पसरण्याची शक्यता असते. म्हणून पाणी निर्जंतुक, फिल्टर करून किंवा गाळून, उकळून वापरावे. पहिला पाऊस पडून गेल्यावर नंतर एका भांड्यात वर फडके लावून त्यामध्ये पावसाचे पाणी साठवावे. याला आयुर्वेदात ’दिव्य जल’ असे म्हटले आहे. त्या पाण्याचा जमिनीशी कोणताही संपर्क आलेला नसतो. त्यामुळे त्यात कोणताही दोष येत नाही. हे शुद्ध पाणी वापरण्यास हरकत नाही. माठातले किंवा फ्रीजमधले पाणी वापरू नये. पाणी थोडे कोमटच प्यावे. कोमट पाणी पचायला हलके असते.

या ऋतूत घरात धूपन करावे. ऊद, गुग्गुळ, निंबाची पाने जाळल्यामुळे आजूबाजूचे वातावरण शुद्ध होते.

अशाप्रकारे पथ्यकर आहार विहाराचे पालन केल्यास पावसाळा सृष्टीप्रमाणेच आपणासही उत्साहित करणारा, टवटवी आणणारा ठरेल .

वैद्य श्रीधर राजेंद्र पवार
आरोग्यवेल आयुर्वेद , रहिमतपूर , सातारा
मोबा :- ९४०४४०५७०६, ९५९५५९९८७८ .

  



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंचकर्माचे फायदे: आयुर्वेदिक डिटॉक्स आणि आरोग्याची गुरुकिल्ली 🌿

  पंचकर्माचे फायदे: आयुर्वेदिक डिटॉक्स आणि आरोग्याची गुरुकिल्ली 🌿   पंचकर्म ही आयुर्वेदामधील एक अत्यंत प्रभावी आणि पूर्णपणे शरीर, मन आणि आत्म्याची शुद्धी करणारी चिकित्सा पद्धत आहे. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ (आमा) बाहेर फेकले जातात आणि शरीराचे संतुलन पुनर्संचयित होते. यामुळे आरोग्यात सुधारणा होऊन समग्र कल्याण प्राप्त होते.   पंचकर्माचे फायदे:  1. शरीराची सखोल शुद्धी 🧘‍♀️      पंचकर्माद्वारे शरीरात जमलेले विषारी पदार्थ (आम) बाहेर फेकले जातात. यामुळे शरीराच्या सर्व स्तरांवर शुद्धी होऊन आरोग्यात सुधारणा होते.   2. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे 💪      पंचकर्मामुळे शरीरातील त्रिदोष (वात, पित्त, कफ) संतुलित होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.   3. पाचनशक्ती आणि चयापचय सुधारणे 🍃      पंचकर्मातील विरेचन आणि बस्ती या चिकित्सांमुळे पाचनशक्ती सुधारते आणि चयापचय प्रक्रिया संतुलित होते.   4. ताण-तणाव कमी करणे आणि मानसिक शांती मिळवणे 🧠       शिरोधारा (कपाळावर...

रक्तमोक्षण पंचकर्म: आयुर्वेदातील रक्तशुद्धीकरणाची प्रभावी पद्धत

आयुर्वेदात पंचकर्म चिकित्सा शरीरातील दोष आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी प्रभावी आहे. पंचकर्मातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे रक्तमोक्षण . हे एक असे उपचार आहे ज्यामुळे रक्तशुद्धीकरण करून शरीरातील विकार दूर केले जातात. रक्तमोक्षणामुळे त्वचाविकार, संधिवात, आणि पित्ताशी संबंधित विकारांवर प्रभावी उपचार केला जातो. चला तर मग जाणून घेऊया रक्तमोक्षण पंचकर्माचे महत्त्व, फायदे आणि प्रक्रिया. रक्तमोक्षण म्हणजे काय? रक्तमोक्षण हा पंचकर्मातील एक महत्त्वाचा भाग आहे. या प्रक्रियेत शरीरातील दूषित रक्त बाहेर काढले जाते, ज्यामुळे शरीरातील दोषांचे (विशेषतः पित्त आणि रक्तज विकार) शुद्धीकरण होते. रक्तमोक्षणासाठी विविध पद्धती वापरल्या जातात, जसे की शृंग - कपिंग थेरपी ( सिंंगाचा वापर), जलौका (जळू), किंवा सुईद्वारे रक्त काढणे. या पद्धतीने शरीरातील दूषित रक्त बाहेर काढून नवीन रक्ताची निर्मिती होते आणि विविध विकारांवर उपचार केला जातो. रक्तमोक्षण पंचकर्माचे फायदे रक्तशुद्धीकरण : रक्तमोक्षणामुळे दूषित रक्त बाहेर काढले जाते आणि शरीरात शुद्ध रक्ताचा प्रवाह सुरू होतो. यामुळे त्वचेवरील विकार, पित्ती, आणि अन्य रक्तवि...

शीतपित्त: आयुर्वेदातील दृष्टिकोन

 शीतपित्त हा एक सामान्य त्वचारोग आहे ज्यामध्ये त्वचेवर खाज येणारे चट्टे किंवा फोड तयार होतात. याला आधुनिक वैद्यकात "अर्तिकेरिया" (हायव्ह्ज) असे म्हटले जाते. आयुर्वेदात शीतपित्त हा दोषांमध्ये झालेल्या असंतुलनामुळे होतो, विशेषतः वात आणि कफ यांचे असमतोल आणि रकत (रक्त) धातूतील असंतुलन या विकारास कारणीभूत ठरतात. आयुर्वेद शीतपित्तावर शारीरिक तसेच मानसिक उपचार पद्धतींचा वापर करतो, ज्यामुळे शरीराच्या मूळ दोषांचे संतुलन पुन्हा मिळवता येते. शीतपित्ताचे कारणे  आयुर्वेदानुसार, शीतपित्ताचे मुख्य कारण वात आणि कफ दोषांचे विकार आहेत. यामध्ये खालील कारणे समाविष्ट होतात: - अयोग्य आहार आणि जीवनशैली: अतिशीत किंवा अतिगरम पदार्थांचे सेवन, असमय आहार किंवा अधिक प्रमाणात फास्ट फूड खाणे. - धूलकण, फुलांचा पराग, विशिष्ट खाद्यपदार्थ, औषधे इत्यादींमुळे होणारी अ‍ॅलर्जी. - मानसिक ताणतणाव: दीर्घकालीन मानसिक तणाव आणि चिंता यामुळे शरीरातील दोष बिघडतात. - ऋतु अनुकूलता: अत्यधिक उष्णता, थंडी, किंवा हवामानातील बदलामुळे दोष असंतुलित होतात. शीतपित्ताची लक्षणे शीतपित्तात शरीराच्या विविध भागांवर लालसर, फुगलेले आणि खाज...