मुख्य सामग्रीवर वगळा

जागतिक हृदय दिन २९ सप्टेंबर - जागतिक हृदय दिनानिमित्त सर्वांना आरोग्यदायी शुभेच्छा

 जागतिक हृदय दिन २९ सप्टेंबर - जागतिक हृदय दिनानिमित्त सर्वांना आरोग्यदायी शुभेच्छा 

१९९९ साली World Heart Federation ने हृदयाचे आरोग्य व हृदयरोगाबाबत जनजागृती करण्यासाठी २९ सप्टेंबर हा दिवस जागतिक हृदय दिन म्हणून घोषित केला आहे. एकविसाव्या शतकामधील धकाधकीचे जीवन, मानसिक ताणतणावामुळे सध्याच्या काळामध्ये हृदय आणि हृदयाशी निगडीत आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसून येते. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्यांमध्ये आता विसीच्या आसपासच्या वयाचे बरेच जण आढळतात.  

         हृदय हा शरीरातील महत्वाचा अवयव आहे, जन्मापासून मृत्युपर्यंत हृदयास निरंतर कार्य करावे लागते. त्यामुळे या शरीरातील महत्वाच्या अवयवाची काळजी घेणे गरजेचे आहे.

         जागतिक हृदय दिनानिमित्त हृदयाचे आरोग्य व हृदयरोग याबाबतची माहिती घेऊया –

हृदयाचे आरोग्य चांगले राहावे यासाठी / हृदयरोग होऊ नये म्हणून-

हृदयाचे आरोग्य टिकवण्यासाठी आपले शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले असणे गरजेचे आहे. आपले शारीरिक आरोग्य टिकवण्यासाठी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. दररोज कमीत कमी ३० मिनिट व्यायाम असावा, यामध्ये चालणे, धावणे, सायकल चालवणे, पोहणे याचा समावेश असावा. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार प्राणायाम, ओमकार, योगसाधना हे करता येते.

       सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी आपल्याला आवडत असणाऱ्या छंदामध्ये स्वता:ला गुंतवूण घ्यावे. प्राणायाम, योगसाधना, संगीत याचा वापर करावा.

       आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीमध्ये शारीरिक व मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी पंचकर्म उपचारांचे वर्णन केले आहे, यातील बस्ती, स्नेहन, स्वेदन, शिरोधारा, हृद्यबस्ती याचा हृदयाला बळ देण्यासाठी, हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यामध्ये व हृदयविकारामध्ये फायदेशीर आहे.




हृदयविकार होण्याची कारणे –

हृदयविकार होण्याची कारणे अनेक आहेत त्यातील महत्त्वाची कारणे – जीवनामध्ये वाढते ताणताणाव, बदलती जीवनशैली तसेच -

  • आहारामध्ये अति मसालेदार, तेलकट पदार्थ
  • धूम्रपान करणे
  • अति प्रमाणात जागरण
  • मधूमेह
  • लठ्ठपणा
  • शारिरीक श्रमाची कमतरता
  • अनुवंशिकता
  • इच्छेविरुद्ध घडलेल्या गोष्टी / प्रेमभंग  इ.

हृदयविकारांची लक्षणे –

हृदयविकारांमध्ये लक्षणे ओळखणे फार अवघड असते साधारण दिसणारी अनेक लक्षणे हृदयरोगामध्ये  असू शकतात आणि अन्य लक्षणे दिसू शकतात. पण साधारणपणे खालील लक्षणे असू शकतात -

  • छातीमध्ये खूप तीव्र वेदना होतात आणि श्वसनास त्रास होतो.
  • चालताना दम लागणे.
  • घाम येणे, मळमळ आणि चक्कर येणे ही देखील काही लक्षणे आहेत.
  • साधारणपणे या वेदना छाती व पोटाच्या मधोमध किंवा पाठीच्या मणक्यात असतात तिथून त्या मान किंवा डाव्या हातात जाऊ शकतात.
  • इतर लक्षणे जसे मळमळ, ऊलट्या, अस्वस्थता, कफ, कंप अशी आहेत व ह्या वेदना सुमारे २० मि. पेक्षा जास्त काळ टिकतात.
  • रक्तदाब कमी अथवा जास्त वाढलेला दिसून येतो.

                   या व्यतिरिक्त देखील काही लक्षणे प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळी दिसू शकतात.

हृदयरोग झाला हे ठरवायचे कसे-

  • रुग्णाची तपासणी करून आणि हृदयाची स्पंदने मोजून आणि रक्तदाब कमी किंवा जास्त झाला असेल तर.
  • इलेक्ट्रोकारडिओग्रॅम, ईसीजी घेतला जातो ज्याने हृदयाची विद्युतीय सक्रियता टिपली जाते.
  • ईसीजी मुळे हृदय किती व कसे स्पंदन करते ते कळते, त्यात काही असामान्य लय आहे का ते दिसते आणि जर ह्रदयविकारामुळे हृदयाच्या मांसपेशींचे नुकसान झालेले असल्यास ते दिसते.
  • हृदयाच्या मांसपेशींचे नुकसान झालेले असल्यास ते रक्ताच्या परिक्षणात दिसून येते.
  • छातीचा एक्स-रे देखील घेतला जातो.
  • हृदयाच्या माहितीसाठी इकोकारडिओग्रॅम करता येतो. ही एक प्रकारची स्कँन चाचणी आहे.
  • हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यामधील अडथळे जाणून घेण्यसाठी कोरोनरी एंजियोग्राफी  हि चाचणी केली जाते.

जागतिक हृदय दिनानिमित्त सर्वांना आरोग्यदायी शुभेच्छा 

वैद्य श्रीधर राजेंद्र पवार,

आरोग्यवेल आयुर्वेद, सातारा आणि रहिमतपूर.

मोबा-  ९४०४४०५७०६

 

 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शीतपित्त: आयुर्वेदातील दृष्टिकोन

 शीतपित्त हा एक सामान्य त्वचारोग आहे ज्यामध्ये त्वचेवर खाज येणारे चट्टे किंवा फोड तयार होतात. याला आधुनिक वैद्यकात "अर्तिकेरिया" (हायव्ह्ज) असे म्हटले जाते. आयुर्वेदात शीतपित्त हा दोषांमध्ये झालेल्या असंतुलनामुळे होतो, विशेषतः वात आणि कफ यांचे असमतोल आणि रकत (रक्त) धातूतील असंतुलन या विकारास कारणीभूत ठरतात. आयुर्वेद शीतपित्तावर शारीरिक तसेच मानसिक उपचार पद्धतींचा वापर करतो, ज्यामुळे शरीराच्या मूळ दोषांचे संतुलन पुन्हा मिळवता येते. शीतपित्ताचे कारणे  आयुर्वेदानुसार, शीतपित्ताचे मुख्य कारण वात आणि कफ दोषांचे विकार आहेत. यामध्ये खालील कारणे समाविष्ट होतात: - अयोग्य आहार आणि जीवनशैली: अतिशीत किंवा अतिगरम पदार्थांचे सेवन, असमय आहार किंवा अधिक प्रमाणात फास्ट फूड खाणे. - धूलकण, फुलांचा पराग, विशिष्ट खाद्यपदार्थ, औषधे इत्यादींमुळे होणारी अ‍ॅलर्जी. - मानसिक ताणतणाव: दीर्घकालीन मानसिक तणाव आणि चिंता यामुळे शरीरातील दोष बिघडतात. - ऋतु अनुकूलता: अत्यधिक उष्णता, थंडी, किंवा हवामानातील बदलामुळे दोष असंतुलित होतात. शीतपित्ताची लक्षणे शीतपित्तात शरीराच्या विविध भागांवर लालसर, फुगलेले आणि खाज...

हिवाळ्यात आरोग्य कसं जपावं? आयुर्वेदिक सल्ला...

हिवाळ्यात आरोग्य कसं जपावं? आयुर्वेदिक सल्ला... हिवाळा हा थंडगार आणि आल्हाददायक असं वातावरण घेऊन येतो. पण, थंडीच्या दिवसांत आपलं शरीर आणि मन संतुलित ठेवण्यासाठी अधिक काळजी घ्यावी लागते. आयुर्वेदानुसार, हिवाळ्यात शरीराची देखभाल करून आपण ऊर्जावान आणि निरोगी राहू शकतो. चला तर मग, हिवाळ्यात आयुर्वेदिक पद्धतींनी आरोग्य कसं जपावं हे जाणून घेऊया. हिवाळा आणि दोषांची समज आयुर्वेदानुसार, हिवाळा मुख्यतः वात आणि कफ दोषांशी संबंधित आहे. वात दोष हा थंड, रुक्ष, हलका आणि गतिशील असतो, तर कफ दोष स्थिर आणि ओलसर असतो. हिवाळ्यात शरीरात थंडी आणि रुक्षता वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीराला गरम, स्थिर आणि स्निग्ध ठेवणं गरजेचं असतं. १. उष्ण आणि पौष्टिक आहाराचा अवलंब करा हिवाळ्यात आपलं पचनशक्ती अधिक मजबूत असते. यामुळे शरीर गरम आणि पौष्टिक पदार्थांना अधिक चांगल्या प्रकारे पचवू शकतं. गरम पदार्थ खा : सुप, पेज, खिचडी अशा गरम पदार्थांचा आहारात समावेश करा. या पदार्थांमध्ये रूट व्हेजिटेबल्स, डाळी आणि तृणधान्यांचा समावेश करा. तुप आणि तेलाचा वापर करा : गायीचं तूप, खोबरेल तेल, तिळाचे तेल हिवाळ्यात विशेषतः उपयुक्त असत...

हिवाळ्यात हातापायांना भेगा का पडतात? - आयुर्वेदीक कारणे व उपाय

  हिवाळ्यात हातापायांना भेगा का पडतात? - आयुर्वेदीक कारणे व उपाय हिवाळ्याच्या थंडीमध्ये त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात, आणि त्यामध्ये हातापायांना पडणाऱ्या भेगा ही एक सामान्य पण त्रासदायक समस्या आहे. आयुर्वेदानुसार, हिवाळ्याच्या ऋतूत "वात दोष" वाढतो, जो थंड, कोरडा, आणि कठोर गुणधर्मांनी युक्त असतो. हिवाळ्यातील थंड व कोरडे वातावरण त्वचेला हानी पोहोचवते आणि यामुळे त्वचा कोरडी होऊन भेगा पडतात. चला जाणून घेऊया, हिवाळ्यात हातापायांना भेगा का पडतात आणि त्यावर आयुर्वेदिक उपाय कोणते आहेत. हातापायांना भेगा का पडतात? आयुर्वेदिक कारणे वात दोषाचा प्रभाव आयुर्वेदानुसार, हिवाळ्यात वात दोष तीव्र होतो, ज्यामुळे त्वचेत कोरडेपणा येतो. वात दोषामुळे त्वचेचा ताण वाढतो आणि त्वचेमधील लवचिकता कमी होते, ज्यामुळे भेगा पडतात. त्वचेतील आर्द्रतेची कमतरता हिवाळ्यात त्वचेमधील नैसर्गिक ओलावा हरवतो, ज्यामुळे त्वचा कठोर व कोरडी होते. वात दोष वाढल्यामुळे त्वचेची आर्द्रता कमी होते, आणि त्वचेवर ताण निर्माण होतो, ज्यामुळे हातापायांवर भेगा पडू शकतात. अयोग्य आहार आणि जीवनशैली वातवर्धक पदार्थांचा (जसे की थंड, को...